वरवंडी (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील एकूण १४४ ग्रामपंचायतींच्या सन २०२६ ते २०३० या कालावधीतील सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया बुधवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालयातील सभागृहात पार पडली.अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ११ ग्रामपंचायतच्या जागा तर अनुसूचित जमातीसाठी २४ जागा आरक्षित करण्यात आल्या तसेच प्रवर्गासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३९ जागा निश्चित करण्यात आल्या तर ७० ग्रामपंचायतीत सरपंच पद हे खुला प्रवर्गासाठी असेल.सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसिलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत पार पडला झाला,नायब तहसिलदार सुभाष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तर महिला आरक्षण सोडत २५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे.
सरपंच पदाचे आरक्षण सोडत होताच वरवंडी गावात चर्चेला उधाण आले आहे ,तालुक्यातील वरवंडी अनुसूचित जमाती आणि खांबे पहिल्यांदाच अनुसूचित जातीसाठी गावचे सरपंच पद राखीव झाल्याने सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत.
आता पुढील काही दिवसातच निवडणूक जाहीर होऊन प्रत्यक्षात निवडणुकांना सामोरे जावे लागणार वरवंडी हे गाव मागील वर्षी सरपंच पदाच्या निवडणुकी दरम्यान वादाच्या भोवऱ्यात सापडले होते,गेल्या पंचवार्षिक मध्ये विखे पा.गटाचे तेरा एकनिष्ठ कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड करण्यात थोरात गटाच्या प्रस्थापितांना सहज शक्य झाले होते.
कारण तत्कालीन आमदार.बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते पोलिसांवर यांचा दबाव होता कारण वाद जर दोन गटांमध्ये झाला तर एकाच गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल कसा होतो अशी चर्चा सर्वत्र होत होती या प्रकरणानंतर आज आरक्षण जाहीर होताच जुन्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे.
कोळसे उगाळून वरवंडी गावात यांची चुरस चर्चा सुरू झाली आहे व या दोन्ही थोरात गट व विखे गट गटांकडून उमेदवारांची पडताळणी सुरू झाली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक झाली त्यात विखे गटाच्या स्थापलिंग ग्राम विकास मंडळ यांचे एकतर्फी वर्चस्व दिसून आले.
त्या लढतीत ११/० अशी लढत झाली यामध्ये विखे गटाचे अकरा उमेदवार निवडून आले व थोरात गटाचा दारूण पराभव झाला कारण गावातील तेरा लोकांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम झाले याच मुळे सर्व लोकांच्या मनात सहानुभूतीची भावना होती.
वरवंडी गावाची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची राहिलेली आहे जरी हि ग्रामपंचायत थोरात यांच्या विधानसभा मतदारसंघात येत असली तरी मागील काही वर्षांपासून मतदारांनी मात्र थोरात त्यांच्याकडे पाठ फिरवून विखे गटाला नेहमीच उजवे कौल दिले आहे.त्यामुळे या गावात नेहमीच सारखीच तुल्यबळ,लढत दिसते.
विखे गटाला मात्र नियमित वर्चस्व मिळत गेलेले आहे.यामुळे सर्व गावाचे व बाजूच्या गावांचे देखील लक्ष निवडणुकीच्या तारखे कडे लागले आहे सध्याच्या वरवंडी गावच्या सरपंच सौ.किरण गणेश गागरे या देखील विवादाच्या भोवऱ्यात मागील पाच वर्षात होत्या कारण त्या निवडून विखे गटाकडून आल्या मात्र निवडून येऊन काही दिवस होतातच त्यांनी थोरात गटात प्रवेश केला यामुळे वरवंडी ग्रामपंचायत नेमकी कुणाच्या ताब्यात असा प्रश्न निर्माण होत राहिला आहे परंतु यावर्षीच्या निवडणुकीत त्यांची देखील घर वापसी होऊ शकते असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.
निवडणुकांपूर्वीच सौ.किरण गागरे पुन्हा विखे गटात सामील होतील अशी देखील चर्चा सुरू आहे.एकंदरीत यावर्षीची निवडणूक देखील चुरशीची होईल अशी चर्चा सर्वत्र होत आहे.