दिप प्रज्वलन करत पहलगाम येथील मृतांना श्रद्धांजली
श्रीरामपूर दिपक कदम जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत येथील महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
पहलगाम घटनेत मृत्त पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचे पंतप्रधान शहानवाज शरीफ यांच्या फोटोला जोडे मारले तसेच भारत सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी
सरकारच्या चिंधड्या उडून दहशतवाद्यांचा कायमचा खतमा करावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.
पहलगाम येथील पर्यटकावर झालेला हल्ला हा पर्यटकावर नसून तो हल्ला संपूर्ण देशावर आहे त्यामुळे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रुर हल्ल्याचा देशभरात संतापाची लाट उसळली आहे मोदी सरकारने या हल्ल्याचा शंभर पटीने बदला घेऊन भारताची ताकद पाकिस्तानला दाखवून द्यावी.
आमच्याकडे कोणी वाकडी नजर केली तर त्याला आम्ही नेस्तानाबूत करतो या कारवाईसाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकार बरोबर असून मोदी सरकारने त्वरित आपली ताकद दाखवावी यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशन अध्यक्ष
गौतम उपाध्ये भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड शिवसेना तालुका अध्यक्ष राधाकिसन बोरकर शहराध्यक्ष संजय छल्लारे सिद्धार्थ मुरकुटे रिपाईचे शहराध्यक्ष विजय पवार राष्ट्रीय जनसेना पार्टी जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड बसपाचे जिल्हाध्यक्ष
सुरेश कांबळे सुनील मगर दीपक कदम डॉ. शंकर मुठे रिपाई महिला आघाडीच्या रमा धीवर सुनिता दाभाडे परविन शहा निलेश शिरसागर वसंत साळवे अशोक अभंग रितेश एडके बाळासाहेब चांडोळे कन्हैया कुकरेजा अमरजित सिंग चुग बाळासाहेब जपे अनिल चांडोळे विकास राजपूत विकी बत्रा विजय करंडे दीपक माकीजा रोशन बत्रा सलीम शेख कैलास बाविस्कर विशाल थोरात नितीन कापुरे अनंत धुमाळ हरीश बठेजा संजय मगर भाऊ शिंदे मच्छिंद्र साळुंके अनिल बागुल अण्णासाहेब दाभाडे राजेश लहारीया आदी उपस्थित होते सुत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले