श्रीरामपूर दिपक कदम काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कोल्हार येथील हिंदुत्ववादी,सामाजिक,धार्मिक संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ व दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हार भगवतीपुर ग्रामस्थ व व्यापारी यांच्याकडून घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
कोल्हार शहरातील माधवराव खर्डे पाटील चौकात हल्ल्यातील निष्पाप मृतांना श्रद्धांजली अर्पण देखील करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील आस्थापना मालकांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत आपली दुकाने व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती.