श्रीरामपुर दिपक कदम येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.या हल्ल्याने संपूर्ण देशासह श्रीरामपुरात संतापाची लाट उसळली असून पर्यटकांची नाव जात नाही तर धर्म विचारुन हत्या करणाऱ्या दहशतवादी पोसणारा पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करुन खात्मा करावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे.
यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करताना भाजपचे मा. तालुकाध्यक्ष दिपक पटारे,भाजपा नेते संजय फंड, मा. नगरसेवक आशिष धनवटे, संजय गंगाड,शामलिंग शिंदे, विशाल अंभोरे, कैलास दुबय्या, गौतम उपाध्ये, मनोज लबडे, डॉ. शंकर मुठे, विजय आखाडे,
महिला शराध्यक्ष पुष्पालात हरदास, पुजा चव्हाण, सोमनाथ गांगड, नाना गांगड, सुभाष पानसरे, सागर भागवत,डॉ. रवींद्र महाडिक, बाळासाहेब हारदास, सनी सानप, विजय शेलार, रवि तुपे, जितू पवार, युवराज फंड, सिद्धार्थ फंड, प्रदीप कुऱ्हाडे, निलेश बोरावके,बाळू खाबिया,
विवेक गिरमे, मनोज लबडे, प्रशांत देशमुख, राहुल सराफ, राजु यादव, जयेश खर्डे, बाबा ढगे, सुजित सुखदरे, उमेश छल्लारे, कुणाल करंडे, कल्पेश माने, राजेंद्र वाघमारे, गणेश जाधव, संजय कुलथे, संतोष हजारें, अनिल देवकर, सनी जाधव,पूजा चव्हाण, पुष्पलता हरदास,सागर बर्वे, मयुर हासे, भूषण सूर्यवंशी, ऋषिकेश कुमावत, वैभव रासने, डॉ.वैभव पंडित, अशोक पवार, गणेश नागरे, दिगंबर फरगडे, रमेश उंडे,भरत विधाटे,अमोल शेटे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी दिपक पटारे यांनी पहलगम येथील दहशदवादी भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारत वासियांना श्रद्धांजली व्हाऊन देशाचे प्रंतपधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसें उत्तर द्यावे.
तसेच भाजपचे नेते संजय फंड यांनी दहशदवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करत श्रीरामपूर येथील तृतियपंथीयाचे पिंकी गुरु हे पहलगम येथे अडकले असता त्यांच्याशी संपर्क साधून धिर देत व गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्याचे सांगून ते सुखरूप श्रीरामपुरात परत येणार आहे आशी माहिती दिली.