लातूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क उदगीरकडे जात असताना दोन ट्रॅव्हल बसमध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार तर ३४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पुणे ते उदगीर जाणाऱ्या कृष्णा व अभिनव ट्रॅव्हल्सचा गुरुवारी पहाटे पाच वाजता उदगीरकडे जात असताना औसा तालुक्यातील उजनी पासून एक किलो मिटर अंतरावर अपघात झाला. या घटनेत दोन जण ठार तर ३४ जण जखमी आहे. त्यात ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
तुळजापूर ते लातूर महामार्गावर उजनी नजीक गुरुवारी पहाटे एकता बियर बार जवळ उदगीरकडे निघालेल्या कृष्णा ट्रॅव्हल्स क्रमांक एआर ०१ वाय ३५५५ या गाडीला पाठीमागून आलेली अभिनव ट्रॅव्हल्स एमएच २४ एब्ल्यू १२१२ या गाडीने जोराची धडक दिली. यात कृष्णा ट्रॅव्हल्सची बस जागीच पलटी होऊन त्यात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत.
तर अभिनव ट्रॅव्हल्सचा क्लिनर नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी (वय ४०, रा. अळवाई, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) हा जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच लातूर येथील पोलीस महामार्गचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भोसले,योगीराज नागरगोजे व भादा पोलिस निरीक्षक महावीर जाधव, रतन मोरे, अनंता कांबळे, माऊली फड, अनंत शिंदे यांनी धाव घेतली. तसेच उजनी येथील हॉटेल चालक व कामगारांना मदतीसाठी बोलवण्यात आले. मयत नामदेव व्यंकटरावा सूर्यवंशी यांचे पार्थिव उजनी येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.