-आश्वी परिसरात वादळी पावसाचे तांडवनृत्य
-आश्वी बुद्रुकचा आठवडे बाजार पाण्यात
-आश्वी खुर्द येथे घरावर विद्युत खांबळे पडून तिन लाखाचे नुकसान तर विज पडल्याने भौतिक नुकसान
-कांद्याचे प्रंचड नुकसान,शेतकरी चिंताग्रस्त
बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस खोळंबा
आश्वी संजय गायकवाड -गेली पंधरा दिवसापासुन सुरु असलेल्या रिमझिम पावसाने आज अचानक आश्वी परिसरात रुद्र अवतार धारण करत सुमारे एक तास वादळी वारे विजांचा कडकडाट करत आश्वी बुद्रुकचा आठवडे बाजार दुसऱ्यांदा अक्षरशा उधळून लावला.
आश्वी खुर्द येथील विक्रम दिलीप मांढरे यांच्या घरावर विज पडुन सुमारे तिन लाखांचे नुकसान झाले यात स्लॅबला तडे गेले दोन छिद्र पडले सौर पॅनल फुटले इन्हर्टर जळुन खाक झाले तर घरातीतील सर्व लाईट फिटींग फॅन ट्युब जळाले असुन सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नाही.
विज पडली तेव्हां घरातील सर्व सदस्य हॉल मध्ये होते मात्र त्यांचे नशिब बलवंतर असल्याने ते सुखरूप आहे तर प्रदिप वाल्हेकर यांचा कांदा काढणीला आला होता मात्र दररोज पाऊस व आज प्रंचड पाऊस झाल्याने तोंडाशी आलेला कांदा सडल्यात जमा असुन सुमारे १ लाखाचे नुकसान झाले.
मुन्तोडे वस्ती पिंप्री फाटा येथेही मोठ मोठी झाडे वादळाने पडली आहे उंबरी बाळापुर येथील संजय मैड यांच्या घरासमोरील मोठे लिंबाचे झाड उन्मळुन पडले सोमवारी सायंकळी विजेचा लखलखाट ढगाचा प्रचंड गडगडाट बरोबर सोसाटयाचा वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जोरदार धुमाकूळ करत आश्वी बुद्रुक येथील आठवडे बाजाराला अक्षरशः झोडपून काढले या पावसाने आठवडे बाजारातील शेतकरी व व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
अनेकांनी पावसापासून संरक्षणा साठी बांधलेले प्लॅस्टिक कागदाचे पाल उडुन गेले.शसोमवारी दुपारी ४ नंतर संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द उंबरी बाळापुर ओझर खुर्द ओझर बु ॥ निमगाव जाळी प्रतापपुर शेडगाव शिबलापुर माळेवाडी हंगेवाडी पानोडी पिंप्री फाटा पिंप्री लौकी अजामपुर खळी झरेकाठी चनेगाव दाढ खुर्दसह पंचक्रोशीतील गावांना पावसाने तडाखा ठेवून दिला.यावेळी तासभर चाललेल्या जोरदार पावसामुळे आश्वी बुद्रुकचा आठवडे बाजारा सह जनजीवन विस्कळित झाले.अनेक व्यापाऱ्यांचा माल भिजल्याने नुकसान झाल्याने व्यापारी गोंधळून गेले होते.
सोमवारी सकाळपासूनचं ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवेत उकाडा वाढला होता. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल एक तास जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते.आश्वी खुर्द येथील शेतकरी संपत मुरलीधर गायकवाड यांच्या घराच्या दोन पुर्णभिंती या पावसाने पडल्या असुन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जिवितहानी टळली
दरम्यान आंबा ,जांभुळ,डाळिंब या फळपीकासह कांद्याचे टॉमेटो मका गवार अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले.असुन शेतकरी हवालदिल झाला आहे.