नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यामध्ये रोहिणी नक्षत्राचा थुईथुई पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये दरड कोसळली होती.जिल्ह्यातील बारा तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केलेली आहे एकूणच जिल्ह्यामध्ये १७०.७मिलिमीटर पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये तीन मे पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस २४ दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण १७० पॉइंट सात मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे तर सोमवारी उशिरा १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी व नाशिक या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम होता.
सोमवारी रात्री उशिरा विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्यातील सादुहने या ठिकाणी मुकुंदा लक्ष्मण वड यांचा हेल्या जनावरांवर रात्री झालेल्या पावसामुळे नैसर्गिक वीज पडून मयत झाला. इगतपुरी तालुक्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कसारा घाट येथे मंगळवारी सकाळी दरडीचा काही भाग कोसळला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये सटाणा,येवला, निफाड आणि चांदवड या चार तालुक्यांनी शंभरी पार केली आहे.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे, तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केलेला आहे.