आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करताना संघर्ष आणि यशाचे समाधान मिळते-थोरात

Cityline Media
0



डॉ.संतोष खेडेकर लिखित सुधाकर जोशी यांच्या प्रकाशवाट या पुस्तकाचे लोकनेते बाळासाहेब थोरातांच्या हस्ते प्रकाशन

संगमनेर दिपक कदम प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक पुस्तक दडलेले असते.प्रत्येकाने जीवनात मागे वळून पाहताना, आपले सिंहावलोकन केले पाहिजे.संघर्ष केल्याने यशाचे समाधान मिळत असून, सुधाकर जोशी यांच्यावरील 'प्रकाशवाट' हे पुस्तक सर्वांसाठी कठीण प्रसंगातून यश मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
मालपाणी लॉन्स येथे अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या जीवन कार्यावर डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या 'प्रकाशवाट' पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.कांचन थोरात, सौ.संजीवनी जोशी, सौ.प्रभावती जोशी,डॉ. जयश्री थोरात, माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते.

थोरात पुढे म्हणाले की,संघर्ष केल्यानेच यशाचे खरे समाधान मिळते. सुधाकर जोशी यांनी चांगल्या संस्कारातून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अत्यंत प्रामाणिक सेवा दिली आहे. बँकिंग क्षेत्रात त्यांचे काम मोठे असून त्यांच्या जीवनातील अनुभवांचे प्रकाशवाट हे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात, परंतु संघर्षांतून पुढे आल्यानंतर जीवनाचा खरा आनंद मिळतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कथा दडलेली असून, यशस्वीतेसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करण्याचे आवाहन माजी मंत्री थोरात यांनी केले.

आमदार सत्यजित. तांबे म्हणाले, की बँकिंग क्षेत्रात काम करताना सुधाकर जोशी यांनी अनेक माणसे जोडली. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा इतिहास लिहावा अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळणार आहे. स्वागत विष्णुपंत रहाटळ, प्रास्ताविक डॉ. संतोष खेडलेकर यांनी, तर अमेय जोशी यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!