पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रेची बैठक

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री.नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी आज  जिल्ह्यात आयोजित करावयाच्या तिरंगा यात्रेच्या तयारी बाबत भाजपा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी ना. विखे पा. यांनी " तिरंगा यात्रा अत्यंत उत्साहात आणि प्रभावीपणे आयोजित करावी आणि मोदी सरकारने आणि भारतीय सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने केलेल्या अतुलनीय कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी," अशी सूचना केली. यावेळी भाजप नेते. विनायक देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग). दिलीप भालसिंग, भाजपा जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग). नितीन दिनकर व जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!