नाशिक जलसंपदाकडून पाणीपट्टीत दहा टक्के वाढ

Cityline Media
0
 मनपावर आर्थिक बोजा; अडीच कोटींचा भार
नाशिक दिनकर गायकवाड- जलसंपदा विभागाने महापालिकेवर पाणीपट्टी दरवाढीचा बॉम्ब टाकला असून दहा टक्के दरवाढ केली आहे. यामुळे महापालिकेला वर्षाला अडीच कोटी रूपये जादा मोजावे लागणार आहे.मागील तीन वर्षापासून महापालिका पाणीपुरवठा विभाग जलसंपदाला वर्षावत्ती २४ कोटी रूपये मोजत असून आता दरवाढीमुळे २६ कोटी ५० लाख रुपये मोजावे लागणार आहे.
नाशिककरांची तहान गंगापूर धरणातून मागवली जाते. गंगापूर धरणातून उपलब्ध जलसाठ्यानुसार वर्षाला महापालिकेसाठी पाणी आरक्षित ठेवले जाते. पाणीपुरवठा विभाग दिवसाला २४५ एमएलडी पाणी उचलते. महापालिका गंगापूर धरणातील पाणी उपलपोटी जल विभागाला दरवर्षी पाणीपट्टी अदा करते.महापालिका व जलसंपदा बांध्यात सन २०२२ ते २०२८ या कालावधीसाठी पाणीवापराबाबत करार झाला.

पहिल्या तीन वर्षासाठी दहा हजार लिटरसाठी ६.५० पैसे दर आकारला जातो.त्यानुसार महापालिकेने वर्षाला २४ कोटी रूपये पाणीपट्टी जलसंपदाला अदा केली.

करारात तीन वर्षानंतर दहा टक्के वाढीचा समावेश होता. त्यमुळे आता सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षासाठी दहा टक्के दरवाढीनुसार ६ रुपये ६५ पैसे आकारले जातील. म्हणून वर्षाला अडीच कोटी रूपये जादा मोजावे लागणार आहे.येत्या जून महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे.एकीकडे महापालिका जलसंपदा विभागाला दरवषी कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी अदा करत असली तरी दुसरीकडे शहरवासियांनी जवळपास महापालिकेची २५० कोटींची पाणीपट्टी थकवली आहे.

अत्यावश्यक सेवा असल्याने मनपा धकबाकीदारांचे नळ कनेक्शनहीं कट करु शकत नाही.महापालिकेने यापूर्वी पाणीपट्टीत सन २०१२ ला वाढ केली होती. मनपा पाच रुपयात हजार लिटर पाणी देते. मात्र पाणी उकलणे, जलशुध्दी केंद्राल्टर नरहरभवने यासाठी मोठा खर्च वेली नागरिक पाणीपट्टी भरात नसल्याने हा खर्च ही नियेनासा झाला आहे. शिवाय पाणीपट्टी दरवाढीचा प्रधान राजकीय नेते हाणून पाडतात त्यामुळे मागील बारा वर्षापासून पाणीपट्टीत वाढ होऊ शकली नाही.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!