दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंचा दौरा तीन तासात संपला

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद,ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा,नाशिक शहर, विभाग प्रभाग शाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका तसेच शहराचा व जिल्ह्याचा राजकीय आलेख नजरेसमोर ठेवत जिल्ह्याचा अहवाल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशकात आले.मात्र ठोस चर्चा न करता अवघ्या तीन तासांत पुन्हा मुंबईला परतले अन् कार्यकर्ते संभ्रमात पडले.
मनसेच्या जिल्हा,शहराच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांना सूचना देत दोन दिवसीय दौन्यावर आलेले राज ठाकरे कार्यकर्त्याशी कुठलाही संवाद न साधता निघून गेल्याने पदाधिकारी व कार्यकत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 राज ठाकरे काल नाशिक दौऱ्यावर आले होते.सकाळी ११.१५ वाजता त्यांचे आगमन झाले.दुपारी १२ वाजता त्यांनी जुने स्नेही अतुल चांडक यांच्या घरी स्नेहभोजन केले व दुपारी दीड वाजता ते तातडीने मुंबईकडे
परतले.दोन दिवसांसाठी नाशिक दौन्यावर आलेले राज ठाकरे यांनी अवध्या तीन तासांत मुंबईत परतण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या धावत्या नवऱ्याने मनसेचे स्थानिक नेते मात्र पुरते चक्रावून गेले.सकाळी हॉटेल एपाएपाके येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर मनसेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तेथील काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राज ठाकरे हे अवघ्या पाच दहा पावलांवर असलेल्या मनसेचे ज्येष्ठ नेते अतुल चांडक यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी रवाना झाले,त्यानंतर पुन्हा काही वेळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या

पदाधिकान्यांशी चर्चा करून विभाग प्रभाग तसेच मनसेच्या शाखांच्या नियुक्ती करुन त्यांची सविस्तर नावे आर्दीचा अहवाल सादर करावा त्याच प्रमाणे जुन्या मनसे सैनिकांना व पदाधिकान्यांना पुन्हा पक्षात आणून दिलजमाई करण्याच्या सूचना देत निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक ती यंत्रणा व परिस्थितीचा आढावा घेणारा सविस्तर अहवाल काही दिवसांत आपल्याकडे देण्याच्या सूचना केल्यावर ते अवघ्या तीन तासांत मुंबईला रवाना झाले.

मागील पंधरवडयात राज ठाकरे यांचा दोनदा नाशिक दौरा रद्द झाला होता.त्यामुळे त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याकडे लक्ष लागून होते.विशेषतःआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमु‌ळे

त्यांच्या दौऱ्याकडे स्थानिक मनसे नेते,पदाधिकारी व कार्यकत्यांचे लक्ष लागून होते.राज ठाकरे सोमवार व मंगळवार दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार होते. शहर व जिल्ह्याची बंद दाराआड चर्चा करुन पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतील व मरगळलेल्या पक्ष संघटनेत जोश भरतील, कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण करतील,अशी अपेक्षा होती. त्याच दृष्टीने त्यांच्या स्वागताची व हॉटेल निवासाची चोख बडदास्त स्थानिक नेत्यांनी ठेवली होती. सकाळी सव्या अकराच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. पदाधिका-यांनी जल्लोषात स्वागत केले.त्यानंतर मोजक्या सहकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर नाशिकमध्ये अतुल चांडक त्यांच्यासोबत होते. त्यांना महत्वाचे पदही देण्यात आले.परंतु नंतर मात्र नात्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ते एकमेकांपासून दूर गेले होते. मात्र नाशिक दौऱ्यात ठाकरे यांनी चांडक यांच्या निवासस्थानी भोजन घेत जुन्या नात्यातील कडूपणा दूर केल्याचे बोलले जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!