मुंबई प्रतिनिधी पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला मदत करणाऱ्या, तुर्कीच्या कंपन्यांवर बंदी घातली आहे.ह्याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड हॅन्डलिंगचे काम करणाऱ्या,तुर्कीच्या ‘सेलेबी नास’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला.त्यामुळे कंपनीतील ३७०० कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की ओढवलीय.पण भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेत, इंडो थाई कंपनीत ह्या कामगारांना सामावून घेतले.
ह्याच पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेतील सदस्यांनी आणि कामगारांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख . उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी ह्या सर्व कामगारांना दिलासा दिला,कामगारांसोबत सदैव उभे राहू;असे यावेळी त्यांनी कामगारांना आश्वासित केले.
प्रसंगी शिवसेना नेते-खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच भारतीय कामगार सेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
