नाशिक दिनकर गायकवाड नांदगाव तालुक्यातील
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तीन कर्मचारी निलंबित केल्याने त्याच्या निषेधार्थ नुकतेच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू असताना त्याला बाजार समितीमधील सर्व घटकांनी पाठींबा दिला होता.
त्याच ठिकाणी संचालक संजय पवार आणि व्यापारी यांच्यात काही वाचावावी झाल्याने व्यापा-यांनी लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतला, तर कर्मचाऱ्यांनी वाद चिघळत असल्याचे पाहून त्यांचे आंदोलन आटोपते घेतले.मात्र यामध्ये शेतक-यांचे नुकसान झाल्याने तिव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सभापती दिपक गोयल यांच्या विरोधात सत्ता संघर्ष सुरू असल्याने गेल्या घार महिन्यांपासून बाजार समितीत बाद गुरु आहे. मात्र या वादात शेतकरी, कामगार व व्यापाऱ्याचे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप सिटू युनियनचे विजय दराडे यांनी केला आहे. बाजार समितीच्या विद्यमान सभापतींनी कोणतेही कारण नसतांना सचिव बळीराम चौधरी, पर्यवेक्षक वसंत पुगे, प्रभारी सचिव मिना बाविस्कर यांचे निलंबन केले आहे. त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना काही कारण नसतांना धमकावले
जात आहे. त्यातच कर्मचाऱ्यांचे काही महिन्याचे पगार अद्याप झालेले नाही. या प्रकारच्या निषेधार्थ काल बाजार समितीचे सर्व कर्मचारी हमाल,गाधारी यांनी काम बंद आंदोलन करुन बाजार समिती समोर ठिय्या मांडला या आंदोलनाला व्यापाऱ्यांसह सर्व बाजार घटकांनी पाठिंबा दिला.
त्यामुळे काल बाजार समितीत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. लिलावही झाले आहेत हे आंदोलन सुरू असतांना माजी सभापती, विद्यमान संचालक संजय पवार व कांदा व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती आवारात लिलावावरून वादावादी
झाली त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीत लिलावासाठी आलेला कांदा घेण्यास नकार दिला.प्रतिक्षेत सायंकाळपर्यंत बाजार समिती आवारात उभे होते. तर याबाबत व्यापाऱ्यांनी त्या संचालकांच्या विरोधात पोलीस स्थानकात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. निताय न झाल्याने शेतक-यांचे प्रचंड हाल व आर्थिक नुकसान झाले.
समितीचे कर्मचाऱ्यांनी उच्च जिल्हा उपनिबंधकांसह पणन संचालक यांच्यासह सर्व संबंधितांना लेखी निवेदन पाठविले आहे.