मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पा. यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यांच्या मागण्यांमध्ये कोणतीही कमी राहू नये,तसेच अंमलबजावणीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये,यासाठी राज्याचे ॲड.जनरल यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा., सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री.गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री शिक्षण मंत्री दादा भुसे.मकरंद पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.