संगमनेर संपत भोसले अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा हा सण आपल्या आयुष्यात नव्या आशा, नवचैतन्य आणि सकारात्मक बदलांचा उत्साह घेऊन येवो, आणि या संगमनेरच्या विकासाचा दीप आपणा सर्वांच्या साथीने अधिक तेजोमय करूया असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.दीपावली सणानिमित्त शुभेच्छा देताना आमदार खताळ म्हणाले “आपल्या सहकार्यामुळे संगमनेर तालुका सर्वांगीण प्रगती आणि परिवर्तनाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.आपला विश्वास आणि साथ हीच माझ्या कामाची प्रेरणा आहे.
आपला बळीराजा जो वर्षभर पाऊस, दुष्काळ, संकटं आणि आव्हानं सहन करत शेती करतो, तोच समाजाचा खरा दीप आहे. त्याच्या श्रमामुळेच आपल्या घराघरात समृद्धीचा प्रकाश येतो .आज नैसर्गिक संकटं आणि अनिश्चित पावसाच्या काळातही बळीराजा खचत नाही;उलट नव्या उत्साहाने आणि नव्या आशेने दिवाळी साजरी करतो.आम्ही महायुती सरकार म्हणून बळीराजाच्या सोबत आहोत.त्यांच्या श्रमांमुळेच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळते आणि प्रत्येक घरात आनंदाचा प्रकाश पसरतो .माझ्या येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये विकासाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख संगमनेरला मिळवून देण्याचा प्रयत्न राहील,”असे आमदार अमोल खताळ यांनी सांगून आमदार अमोल खताळ यांनी सर्व नागरिकांना आनंदमय, मंगलमय आणि सुरक्षित दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी सणातून सामाजिक एकतेचा संदेश मिळतो
“आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात,पण दीपावली हा असा सण आहे ज्यामध्ये थोरा-मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आणि महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतो.ही दिवाळी केवळ प्रकाशाची नव्हे, तर आपले परिश्रम, एकता आणि आनंदाचा सण आहे.”
अमोल खताळ
आमदार संगमनेर विधानसभा
