आश्वी-जोर्वे गटाचा मेळावा उत्साहात;पालकमंत्री विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
आश्वी संजय गायकवाड आपल्या सर्वांच्या योगदानामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले.हे लोकांसाठी काम करणारे सरकार असून,नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून केवळ घोषणा नव्हे, तर मदतीची अंमलबजावणी केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तेवढ्याच जोमाने काम करून महायुतीला विजयी करण्यासाठी कटीबद्ध व्हावे," असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्त्यांचा हा भव्य मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला ज्येष्ठ नेते संस्थानिक शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जेष्ठ नेते मा.जि.प. सदस्य आण्णासाहेब भोसले शिवाजीराव जोंधळे, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, बापुसाहेब गायकवाड निवृत्ती सांगळे, मच्छिंद्र थेटे, संतोष रोहोम,आर.डी. कदम, कान्हु गिते सतिष जोशी सरुनाथ उंबरकर जेहुर शेख भगवान इलग रंगनाथ उंबरकर, माधवराव गायकवाड गोकुळ दिघे , विनायक बालोटे,ज्ञानदेव वर्पे, महिला भाजपा जिल्हा अध्यक्षा सौ. कांचन मांढरे, मा.जि.प. सदस्या ॲड.रोहिणी निघुते मकरंद गुणे बाळासाहेब मांढरे भारत गिते सोमनाथ डोळे ॲड. पोपट वाणी अशोक जऱ्हाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-शेतकऱ्यांना मदत आणि विकासाचे आश्वासन:
मंत्री विखे पाटील यांनी भाषणात मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की,नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य सरकारने कोणताही विलंब न करता ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली.
तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ कोटी २० लाख रुपयांची मदत मिळाली आहे.कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आली.
निळवंडे उजव्या कालव्याची सोडवणूक करून शेतकऱ्यांना पाणी देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी दीडशे कोटी रुपयांची उपलब्धता करून दिली आहे.
-रोजगार निर्मितीवर भर:
शिर्डी मतदारसंघातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता औद्योगिक वसाहतीची सुरुवात गतीने होत असून, अनेक उद्योजक तेथे उद्योगांची उभारणी करू लागले आहेत. कमी कालावधीत स्थानिक तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विकास कामे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या सूचनांनुसारच होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांची निवडणुक तयारी:
शाळीग्राम होडगर यांनी गट आणि गणाचे नियोजन आत्तापासूनच सुरू करण्याचे आवाहन केले.संतोष रोहोम यांनी, "ना. विखे पाटील जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाले आहे आणि आगामी निवडणुकीत हे परिवर्तन अधिक मोठे होईल," असा विश्वास व्यक्त केला.
-भाजपमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा या मेळाव्यात संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, वाघापूरचे मा. उपसरपंच विनोद घोलप, अमृत दूध संस्थेचे संचालक रामभाऊ शिंदे, वाघापूर सोसायटीचे संचालक साहेबराव शिंदे, साईराम राहाणे, शारदा पतसंस्थेचे नानासाहेब शिंदे, दीपक पानसरे, बाबासाहेब शिंदे, संदीप शिंदे, आणि जोर्वे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ बलसाने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मंत्री विखे यांनी त्यांचे स्वागत केले.
