अन्नदान हेच परमोच्च पुण्य-संजय महाराज जगताप

Cityline Media
0
​-श्रीक्षेत्र भऊर ते आळंदी पायी दिंडी सोहळ्यात प्रेरणादायी मार्गदर्शन
-आश्वी खुर्द येथे श्री स्वामी समर्थ उद्योग समूहाचे वारकऱ्यांसाठी अन्नदान

​आश्वी संजय गायकवाड वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर येथून संत ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आणि ह.भ.प. संजय महाराज जगताप (भऊरकर) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याला नुकतीच भक्तिमय सुरुवात झाली आहे. ५ नोव्हेंबर रोजी माऊलीच्या दर्शनासाठी ही दिंडी श्रीक्षेत्र भऊर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाली आहे.
वाटेत ​आश्वी खुर्द येथे श्री स्वामी समर्थ उद्योग समूहाने कृतज्ञ भावनेने अन्नदान केले.
​दिंडीचा प्रवास श्री स्वामी समर्थ उद्योग समूह,आश्वी खुर्द येथे थांबला असता, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वारकऱ्यांसाठी दुपारी स्नेहभोजनाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. या पवित्र प्रसंगी दिंडी प्रमुख ह.भ.प. संजय महाराज जगताप यांनी वारकऱ्यांना भावनिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

​यावेळी आश्वी खुर्दचे मा.सरपंच म्हाळु गायकवाड, ह.भ.प. संपत गायकवाड, संजय गायकवाड, अदिनाथ जाधव, सचिन पोपळघट, पपलेश लाहोटी भारत साबळे, सचिन खराटे, ऋषीकेश डमाळे, जयश्री गायकवाड, मनिषा जाधव,माया कहार,नंदा कदम वर्षा इघे आदी मान्यवर उपस्थित होते.

​ प्रसंगी प्रेरणादायी वाणीत महाराजांनी वारकऱ्यांशी संवाद साधताना भक्ती आणि सेवेचे महत्त्व विषद केले:
​"चला आळंदीला जाऊ,ज्ञानेश्वर डोळा पाहू! होती संतांची या भेटी,सांगू सुखाची या गोष्टी!"
​त्यांनी पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील वचनाचा आधार घेत सांगितले:

​"भाग्याचे नी बडसे, उद्यमाचे निमसे, संपत्ती जात आपसे, घर लिखे."पुढे बोलताना ​महाराज म्हणाले की "जो समाजासाठी काही देतो, तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे.अन्नदान, नामस्मरण आणि सेवा — हीच खरी माऊलीची वारी सेवा आहे." या ओवीनेच यावर्षीच्या दिंडीचा शुभ संस्कारमय टप्पा साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले.

​वारकरी संप्रदायाचा अध्यात्मिक सेतू ​अन्नदान हे वारकरी परंपरेत केवळ अन्न पुरवणे नव्हे,तर भक्तीचा प्रसाद वाटणे मानले जाते.
​"अन्नदान हेच परमोच्च पुण्य" ही शिकवण आजही वारकरी संप्रदायाने जपली आहे.

​थकलेला जीव जेव्हा अन्नाच्या ताटात समाधान शोधतो, तेव्हा ती केवळ सेवा नसते — ती 'संतसेवा' असते.
​आश्वीतील श्री.स्वामी समर्थ उद्योग समूहातर्फे दरवर्षी आयोजित होणारे हे भोजनदान, भक्ती, सेवाभाव आणि ऐक्याचे प्रेरणास्थान ठरत असल्याचे महाराजांनी नमूद केले.

आश्वी परिसरातील देवस्थानांद्वारे चालविले जाणारे भजन, कीर्तन व सामाजिक उपक्रम समाजात आध्यात्मिकतेसोबत सामाजिक जाणिवा रुजवत असल्याचे त्यांनी सांगितले.दिंडी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांनी या अन्नदान उपक्रमाबद्दल श्री स्वामी समर्थ उद्योग समूहाचे मनःपूर्वक आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!