अहिल्यानगर प्नतिनिधी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक यशस्वीरीत्या पार पडली.या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुमारे ८०१.३७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला नवी दिशा आणि गती मिळणार आहे.
या बैठकीदरम्यान आरोग्य, शालेय शिक्षण, तीर्थक्षेत्र विकास आणि औद्योगिक विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली. तसेच, जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचे स्वागत करत, सर्व विभागांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या निर्णयांमुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा संतुलित व गतिमान विकास साधला जाणार असून, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि विकासात्मक अपेक्षा पूर्ण होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
या बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे,आमदार काशिनाथ दाते, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
