राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणर
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्यास अवघे १२ दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला १३ दिवस बाकी आहेत.मात्र, या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे.चौकशी पूर्ण होईपर्यंत महापालिकेच्या निवडणुकां आधीच राज्यभरात एकूण ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे.या सर्वाची निवडणूक आयोगाकडून चौकशी होण्याचे संकेत मिळत आहेत.बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही,अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
केडीएमसीत भाजपचे १४ व शिवसेना शिंदे गटाचे ६ उमेदवार, तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथे किमान एक भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. कुलाबातील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल (एस) व आपच्या उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप
केला असून या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे. आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त व वॉर्ड 'ए' कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद नाही. २ जानेवारी नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख होती. नंतर संबंधित परतावा अधिकारी,महापालिका
आयुक्त व पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील.निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून, आतापर्यत भाजपाचे ४५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे तब्बल १९ नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक १५ उमेदवार तर
शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २ तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार बिनविरोध झाले,याची संपूर्ण यादीही समोर आली आहे. दरम्यान,खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली होती.
