झरेकाठी सोमनाथ डोळे अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीसाठी अतिवृष्टीग्रस्त असल्याचा दाखला मिळण्याबाबत नुकतेच संगमनेर तहसीलदार यांना भारतीय जनता पक्षाचे संगमनेर तालुक्यातील आश्वी मंडळ अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी निवेदन दिले.
गोकुळ दिघे यांच्या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी संबंधित ग्राममहसूल अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत की याबाबतचे तात्काळ दाखले देण्यात यावे
याबाबत ग्राममहसूल अधिकारी हे शालेय विद्यार्थी यांना दाखले देण्यात टाळाटाळ करत होते. परंतु याबाबत गोकुळ दिघे यांनी एक शिष्टमंडळ घेऊन संगमनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन अतिवृष्टी ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीसाठी अतिवृष्टी ग्रस्त असल्याचा दाखला मिळण्याबाबत केलेल्या या पाठपुराव्यामुळे शालेय विद्यार्थी वर्गात समाधानाची भावना मन झाली आहे भाजपा पक्षाचे गोकुळ दिघे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
