डॉ. सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द
श्रीरामपूर दिपक कदम भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने दिला जाणारा मानाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन भीमराज बागुल सचिन ब्राह्मणे प्रकाश ढोकणे किशोर ठोकळ रमादेवी धीवर चरण त्रिभुवन संजय रूपटक्के संतोष मोकळ अर्जुन शेजवळ आदींच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना एक महत्त्वाची ग्वाही दिली की "येत्या ३ महिन्यात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णा कृती पुतळा उभा करू," असा शब्द त्यांनी यावेळी दिला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्याच बरोबर डॉ बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयावादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतुन समाचार घेतला.
यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे.
जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा," अशी विनंती त्यांनी श्रीरामपूर मधील राजकारण्यांना केली. श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल, असे सांगताना ते म्हणाले, "हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूर मधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल.
आमचा उद्देश स्वच्छ आहे बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता आहे." पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणाऱ्याचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो.
आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे,त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.श्रीरामपूर येथे पार पडलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड,
नाना शिंदे, पक्षप्रतोत वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड,रवी पाटील,आशिष धनवटे, संजय छल्लारे मनोज लबडे ,तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले,डॉ शंकर मुठे, भीमराज बागुल, शेखर दुबय्या नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल दीपक कदम आबासाहेब औताडे
शिवाजी उबाळे मिलिंद धीवर योगेश बनसोडे संदीप धीवर सुरेश ठुबे सुरेश शेळके सोमय सुमेध पडवळ संघराज त्रिभुवन संतोष त्रिभुवन अनिल बागुल सुशीला त्रिभुवन अनिता ढोकणे पुनम ब्राह्मणे ॲड.सोनाली त्रिभुवन मंगल त्रिभुवन प्राजक्ता त्रिभुवन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
